आजकाल नाकर्ते व अपात्र लोक मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका करतायत. म्हणून त्याबद्दल थोडंसं लिहितोय.
सुरुवात खास मुख्यमंत्री फडणवीसांच्या शैलीत...
"सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फडणवीस हे कोणाच्या वहाणा उचलून, शिफारशिवरून, घराणेशाहीतून अथवा हुजरेगिरी करून मुख्यमंत्री झालेले नाहीत. ते कर्तृत्वावर, बुद्धीवर आणि क्षमतेवर मुख्यमंत्री झाले आहेत. कदाचित ही अपवादात्मक गोष्ट असल्याने सगळं आयुष्य सेटलमेंट मध्ये गेलेल्यांना दुःख होणं साहजिक आहे."
"सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फडणवीस हे कोणाच्या वहाणा उचलून, शिफारशिवरून, घराणेशाहीतून अथवा हुजरेगिरी करून मुख्यमंत्री झालेले नाहीत. ते कर्तृत्वावर, बुद्धीवर आणि क्षमतेवर मुख्यमंत्री झाले आहेत. कदाचित ही अपवादात्मक गोष्ट असल्याने सगळं आयुष्य सेटलमेंट मध्ये गेलेल्यांना दुःख होणं साहजिक आहे."
अभ्यास चालू आहे हा मुद्दा गाजतोय. पण जरा सविस्तर विश्लेषण करू. पूर्वीच्या निर्बुद्ध लोकांनी अभ्यास केला नाही म्हणून तर जनतेला अभ्यासू व कार्यक्षम पर्याय द्यायची वेळ आली. जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, ऑनलाईन दाखले ही त्याच अभ्यासू डोक्यातील कल्पना. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावलेत. परिणाम दिसायला वेळ लागेल. पण काम सुरूच आहे. विषय इतके व्यापक आहेत की त्याला वेळ लागणारच. अविचारी निर्णय घ्यायचे नाहीयेत. 60 वर्षे हे लोक दलदलीतल्या म्हशीसारखे ढिम्म बसले म्हणूनच आज वेळ लागतोय. फक्त गुंतागुंत करून ठेवलीय प्रत्येक गोष्टीत. त्यामुळं तूर्तास विरोधकांनी सांगावं की आमच्या मराठा आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं ते कोर्टात का टिकलं नाही? 2009 ला इतकी कर्जमाफी दिली तरी आमचा बळीराजा परत कर्जबाजारी का झाला? मुळात बळीराजा खरंच कर्जमुक्त झाला होता का? एवढया मोठ्या तोंडानं संघर्षयात्रा काढतायत, पण किती सधन शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची पाणीपट्टी थकवलीय याचा अभ्यास आहे का? अनेक जिल्हा बँका 2014 पूर्वीच डबघाईला का आल्या? एवढे वर्ष सत्ता शोषून हा अभ्यास नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासावर बोलायचा काय अधिकार आहे? असं करणे म्हणजे नापास आणि वाया गेलेल्या विद्यार्थ्याने प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यावर शंका घेण्यासारखे नव्हे काय? विरोधकांनी त्यांचा अभ्यास झाला असेल तर जनतेला अहवाल सादर करावा.
जातीय टिकेबद्दल बोलायचं झालं तर इतका कसला जातीय द्वेष आहे? हाच तुमचा पुरोगामी महाराष्ट्र का? जातीय टीका करणारे स्वतःच्या जातीचे पाईक नाहीत. कोणत्याच जातीमध्ये कोणाचा द्वेष करा असं शिकवलेलं नाही. जात व शरीरयष्टीवर बोलून आपण आपले संस्कार दाखवून देतो. किमान असल्या वागण्याने आपल्या सज्जन समाजबंधूंना तरी माना खाली घालायला लावू नये.
साधे Graduation पर्यंतचे विषय सोडवताना दमछाक होणारे लोक आजकाल दुसऱ्याची बुद्धी मोजत आहेत. काही लोक तर बांडगुळासारखे दुसऱ्यानं टाकलेल्या तुकड्यावर जगून प्रकाशझोतात आले. अशा पाकिटमार लोकांपेक्षा भिकारी परवडले. किमान ते खुलेआम तरी भीक मागतात. विकास करण्यात आपण 'सहकुटुंब अनुत्पादक' राहिलो म्हणजे बाकीचे पण तसेच राहणार असं होत नाही ना.
मोठं काम करताना त्रुटी राहू शकतात. ते 'देवेंद्र' असले तरी माणूसच आहेत. त्रुटी जरूर दाखवा. त्या सुधारून काम करण्याची क्षमता असणारे मुख्यमंत्री सुदैवानं लाभले आहेत. मुद्दा एवढाच आहे की त्रुटी दाखवून द्यायला अभ्यास लागतो. जात लागत नाही. नुसतं दुसऱ्याच्या अभ्यासावर बोट ठेवून आपण अभ्यासू होत नाही. स्वतःचा अभ्यास व मुद्दे लागतात. कारण नाकर्त्यांच्या शब्दांना किंमत शून्य असते. आता तरी या 60 वर्षांच्या नाकर्त्यांनी सुधारावं हीच अपेक्षा.
जातीय टिकेबद्दल बोलायचं झालं तर इतका कसला जातीय द्वेष आहे? हाच तुमचा पुरोगामी महाराष्ट्र का? जातीय टीका करणारे स्वतःच्या जातीचे पाईक नाहीत. कोणत्याच जातीमध्ये कोणाचा द्वेष करा असं शिकवलेलं नाही. जात व शरीरयष्टीवर बोलून आपण आपले संस्कार दाखवून देतो. किमान असल्या वागण्याने आपल्या सज्जन समाजबंधूंना तरी माना खाली घालायला लावू नये.
साधे Graduation पर्यंतचे विषय सोडवताना दमछाक होणारे लोक आजकाल दुसऱ्याची बुद्धी मोजत आहेत. काही लोक तर बांडगुळासारखे दुसऱ्यानं टाकलेल्या तुकड्यावर जगून प्रकाशझोतात आले. अशा पाकिटमार लोकांपेक्षा भिकारी परवडले. किमान ते खुलेआम तरी भीक मागतात. विकास करण्यात आपण 'सहकुटुंब अनुत्पादक' राहिलो म्हणजे बाकीचे पण तसेच राहणार असं होत नाही ना.
मोठं काम करताना त्रुटी राहू शकतात. ते 'देवेंद्र' असले तरी माणूसच आहेत. त्रुटी जरूर दाखवा. त्या सुधारून काम करण्याची क्षमता असणारे मुख्यमंत्री सुदैवानं लाभले आहेत. मुद्दा एवढाच आहे की त्रुटी दाखवून द्यायला अभ्यास लागतो. जात लागत नाही. नुसतं दुसऱ्याच्या अभ्यासावर बोट ठेवून आपण अभ्यासू होत नाही. स्वतःचा अभ्यास व मुद्दे लागतात. कारण नाकर्त्यांच्या शब्दांना किंमत शून्य असते. आता तरी या 60 वर्षांच्या नाकर्त्यांनी सुधारावं हीच अपेक्षा.
By
Sanket
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित...
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित...