Right to privacy वरून बराच गदारोळ झाला. नरेंद्र मोदी सरकारची कशी वाट लावली याचा खोटा आनंद साजरा करण्यात एक विशिष्ट वर्ग तल्लीन आहे. याचिकाकर्त्यांचे मुद्दे वा युक्तिवाद वरचढ ठरला यापेक्षा अधिक त्याचं वर्णन करणं मूर्खपणाचं ठरेल. मुळात फिंगरप्रिंट घेणं चुकीचं असलं तर मग त्याची सुरुवात काँग्रेसनं केली होती. आधार क्रमांक व बँक अकाऊंट लिंक बद्दल बोलायचं झालं तर त्याची सुरुवात सुद्धा काँग्रेसनेच केली होती सिलिंडरची सबसिडी खात्यात जमा करून. तेव्हा हे लोक कायद्याच्या कुठल्या पुस्तकात लपले होते माहित नाही. तेव्हा यांच्या प्रायव्हसीवर गदा आली नव्हती कदाचित. दुर्दैवाने ती योजना मधूनच बंद पडली. एक लक्षात घेतलं पाहिजे की जरी 2014 ला पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं असतं तरी त्यांनीही आधारचं अनेक योजनांमध्ये लिंकिंग केलंच असतं. फक्त त्याचा वेग मोदी सरकार इतका राहिला नसता हाच काय तो फरक(पूर्वेतिहास पाहता). मुळात आधारचं लक्ष्यच लांब पल्ल्याचं होतं. पण आपल्याकडचे तळागाळातले म्हणवणारे कथित लोक असतात त्यांना long term गोष्टींचा काहीच गंध नसतो. आज काय चालू आहे बघायचं आणि त्यावर पोळी भाजायची. उद्याची काही पडलेली नसते. उद्या जर पोळी भाजता आली नाही तर हे लोक खोबरं तिकडं चांगभलं प्रमाणे टोप्या बदलून रिकामे होतात. हेच लोक त्याला भाजप वा सरकार विरुद्धचा निर्णय म्हणून रंगवण्यात मग्न आहेत. कुठलंही म्हणजे (काँग्रेस किंवा भाजप) यांचं सरकार असतं तरी त्या सरकारनं आजच्या सरकारचीच बाजू न्यायालयात मांडली असती. आपलं कसं आहे की आम्हांला सुधारणा हव्यात पण त्यासाठी दमडी किंवा कष्ट द्यायची आमची तयारी नाही. साधी गोष्ट आहे. मोबाइल जर फिंगरप्रिंटनं अनलॉक करायचा असेल तर आधी फिंगरप्रिंट मोबाइल मध्ये सेव्ह करावं लागतं. फिंगरप्रिंट देणार नाही आणि मग मोबाइल अनलॉकपण झाला पाहिजे हे गाढवपणाचं लक्षण आहे. हा जो प्रायव्हसीचा माज आहे तो गूगल किंवा ऍपल प्ले स्टोअर मधून ऍप डाऊनलोड करताना कुठं ध्यान करायला जातो ते माहीत नाही. एखादं ऍप डाऊनलोड करायला गेला की कमीत कमी काही परवानग्या द्यायला लागतात. जसं की मोबाइलचं लोकेशन, स्टोरेज, SMS, Contacts, फोटो, कॅमेरा, आयडेंटिटी हे ऑप्शन सर्रास असतात. वापरायची हौस आहे म्हणलं की क्षणार्धात परवानग्या देतो आपण. बरं हा डेटा घेऊन ते सुरक्षित ठेवणार आहेत की कोणत्या कंपनीला विकणार आहेत याचा विचार करण्याचे आपण कष्टही घेत नाही. हा..पण मोदी सरकारचा विषय आला की कुछ तो गलत हो रहा है ही खदखद घेऊन फौज हजर. परवा एका 'विचार दरिद्री' संपादकांनी लिहिलंय की म्हणे app डाउनलोड करायचं का नाही हा choice असतो पण income tax भरायचा choice नाहीये म्हणे तर तो भरावाच लागतो. अहो महाशय असं असेल तर फक्त 3-4% जनताच कसा टॅक्स भरते. म्हणे सिम कार्डला आधार सक्तीचं आहे. अरे मग घेऊ नका. Choice आहे ना. या विरोध करणाऱ्यांनी देखील फुकट मिळतंय म्हणून घेतलंय की jio चं सिम. याला म्हणतात द्वेष. काहीही बोलायचं. कधी तरी राजकारण सोडून विचार करा.
जी सबसिडी खात्यात जमा करण्याची योजना यूपीएनं सुरू केली होती ती कोणामुळं बंद पडली याचा कधी विचार केला आहे का? ती योजना आपल्याच देशाच्या उदासीन नागरिकांमुळं बंद पडली. अनेक लोकांनी बँक खाती जोडलीच नाहीत. त्यामुळं सबसिडी देताना अडचणी व्हायला लागल्या. आणि लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानं सरकारनं जोखीम घेतली नाही. मोदी सरकारनं दणका दिल्यावर सगळे सरळ आले आणि निमूटपणे अकाऊंट जोडलं लोकांनी. आपल्या लोकांना सरळ सांगितलेलं कळत नाही.
कोणत्याही सरकारनं गोळा केलेली माहिती गोपनीय ठेवणं हे सरकारचं काम आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये याला विरोध असण्याचं कारणच नाही. तसं जर काही होत असेल तर त्यावरून न्यायालयात जाऊ. सरकारसोबत भांडू. पण ठसेच देणार नाही हा हटवादीपणा झाला. आमचं आम्ही ठरवू हा उद्दामपणा झाला. काँग्रेसनं सुद्धा तुमच्या घरी चोरी करायला डेटा गोळा केला नव्हता. देशाची सुरक्षा आणि व्यवस्था यासाठीच चाललंय हे. उद्या म्हणाल की चौकातील CCTV काढून टाका. मी कितीवेळा एका रस्त्यावरून गेलो ते सरकारला कळेल. प्रायव्हसी इतकीही असू नये ज्यामुळं देशाच्या प्रगतीत किंवा सुरक्षेत अडथळे येतील.
कुठलंच सरकार परिपूर्ण असणार नाही. आजचंही नाही. पुढचंही नसेल. सगळं काही सरकारनं करायचं आणि आम्ही बसून त्याचा उपभोग घेणार ही मानसिकता सोडली पाहिजे आता. अधिकार तेवढे जाणतो आपण. कर्तव्याचं काय? त्यावर एकदा विस्तृत लिहीन. पण प्रत्येक सरकारला सहकार्य केलं पाहिजे. आपल्या विचारधारेचं नाही म्हणून सतत अडथळे आणायचे हे चुकीचं आहे. हे सर्वांना लागू आहे. मी देखील कधीच काँग्रेसच्या चांगल्या गोष्टींवर व व्यक्तींवर टीका केलेली नाही.
आपल्या लोकांना कलात्मक गोष्टीसुद्धा करता येतात. पण त्यापेक्षा जास्त ओरखडे चांगले मारता येतात. तेही आपण आपल्याच देशाच्या सरकारला दिलेल्या ठशांसाठी असे ओरखडे मारून अडथळे आणत असू तर आपण धन्य आहोत. हाच फरक आहे आपल्यात आणि प्रगत देशांत की आपण खासगीपणाला प्राथमिकता देतो आणि ते लोक देशाला प्राथमिकता देतात. It's all about nation and nationalism.
टीप- आधार कार्डच्या नोंदणीचं काम साधारण 2011च्या सुरुवातीला सुरू झालं होतं. मी स्वतः आधार कार्डसाठी एप्रिल 2011 मध्ये ठसे व आवश्यक कागदपत्रं दिली होती. तेही तब्बल 2 तास रांगेत थांबून. तेव्हा म्हणलं नाही की काँग्रेसचं सरकार आहे. दगाफटका केला तर? सरकार कोणतंही असू दे. नागरिक म्हणून जे सहकार्य करायला हवं ते केलंच पाहिजे. त्यामुळं आजच हे सुचलं असं अजिबात नाही.
जी सबसिडी खात्यात जमा करण्याची योजना यूपीएनं सुरू केली होती ती कोणामुळं बंद पडली याचा कधी विचार केला आहे का? ती योजना आपल्याच देशाच्या उदासीन नागरिकांमुळं बंद पडली. अनेक लोकांनी बँक खाती जोडलीच नाहीत. त्यामुळं सबसिडी देताना अडचणी व्हायला लागल्या. आणि लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानं सरकारनं जोखीम घेतली नाही. मोदी सरकारनं दणका दिल्यावर सगळे सरळ आले आणि निमूटपणे अकाऊंट जोडलं लोकांनी. आपल्या लोकांना सरळ सांगितलेलं कळत नाही.
कोणत्याही सरकारनं गोळा केलेली माहिती गोपनीय ठेवणं हे सरकारचं काम आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये याला विरोध असण्याचं कारणच नाही. तसं जर काही होत असेल तर त्यावरून न्यायालयात जाऊ. सरकारसोबत भांडू. पण ठसेच देणार नाही हा हटवादीपणा झाला. आमचं आम्ही ठरवू हा उद्दामपणा झाला. काँग्रेसनं सुद्धा तुमच्या घरी चोरी करायला डेटा गोळा केला नव्हता. देशाची सुरक्षा आणि व्यवस्था यासाठीच चाललंय हे. उद्या म्हणाल की चौकातील CCTV काढून टाका. मी कितीवेळा एका रस्त्यावरून गेलो ते सरकारला कळेल. प्रायव्हसी इतकीही असू नये ज्यामुळं देशाच्या प्रगतीत किंवा सुरक्षेत अडथळे येतील.
कुठलंच सरकार परिपूर्ण असणार नाही. आजचंही नाही. पुढचंही नसेल. सगळं काही सरकारनं करायचं आणि आम्ही बसून त्याचा उपभोग घेणार ही मानसिकता सोडली पाहिजे आता. अधिकार तेवढे जाणतो आपण. कर्तव्याचं काय? त्यावर एकदा विस्तृत लिहीन. पण प्रत्येक सरकारला सहकार्य केलं पाहिजे. आपल्या विचारधारेचं नाही म्हणून सतत अडथळे आणायचे हे चुकीचं आहे. हे सर्वांना लागू आहे. मी देखील कधीच काँग्रेसच्या चांगल्या गोष्टींवर व व्यक्तींवर टीका केलेली नाही.
आपल्या लोकांना कलात्मक गोष्टीसुद्धा करता येतात. पण त्यापेक्षा जास्त ओरखडे चांगले मारता येतात. तेही आपण आपल्याच देशाच्या सरकारला दिलेल्या ठशांसाठी असे ओरखडे मारून अडथळे आणत असू तर आपण धन्य आहोत. हाच फरक आहे आपल्यात आणि प्रगत देशांत की आपण खासगीपणाला प्राथमिकता देतो आणि ते लोक देशाला प्राथमिकता देतात. It's all about nation and nationalism.
टीप- आधार कार्डच्या नोंदणीचं काम साधारण 2011च्या सुरुवातीला सुरू झालं होतं. मी स्वतः आधार कार्डसाठी एप्रिल 2011 मध्ये ठसे व आवश्यक कागदपत्रं दिली होती. तेही तब्बल 2 तास रांगेत थांबून. तेव्हा म्हणलं नाही की काँग्रेसचं सरकार आहे. दगाफटका केला तर? सरकार कोणतंही असू दे. नागरिक म्हणून जे सहकार्य करायला हवं ते केलंच पाहिजे. त्यामुळं आजच हे सुचलं असं अजिबात नाही.