सप्टेंबर 2017च्या पहिल्या आठवड्यात पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरूमध्ये हत्या झाली. त्याचा निषेध यापूर्वीच केला आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे यांत काहीच दुमत असण्याचं कारण नाही. तथापि अनेक लोक या हत्येचं भांडवल करून कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून मोकळं होत आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांच्या निषेधाच्या पिपाण्या इतर वेळी वाजत नाहीत. पण ठराविक वेळी याच पिपाण्या तुतारीच्या पट्टीत वाजवल्या जातात. या लेखामध्ये ज्या गोष्टी मांडेन त्या वाचून तरी कदाचित अंधद्वेष्ट्यांच्या दृष्टीला थोडा तरी डोळसपणा येतो का ते पाहू.
गोध्रा आणि तत्सम प्रकरणं रवंथ करणाऱ्या प्राणिमात्रांपेक्षाही जास्त वेळा चघळणाऱ्या समस्त लोकांना काही गोष्टींचा सोयीस्करपणे विसर पडतो. काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या व त्यांच्यावर अत्याचार झाले तेव्हा हे मानवी अधिकारांचा पुरस्कार करणारे लोक पुरस्कार वापसी करून माओवादी क्रांतीच्या जंगलात गेले असावेत कदाचित. हे अत्याचार अतिशय भयानक होते ज्यामध्ये लोकांची जीभ कापण्यात आली, जिवंत जाळण्यात आलं. इतकंच नव्हे तर लाकूड कापण्याच्या यंत्रामध्ये घालून जिवंतपणी कापण्यात आलं. तेव्हा हे लोक डोळ्यावर पट्टया बांधून बसले होते.
घरवापसी या शब्दावर आरोपांची राळ होणारे लोक हिंदूंच्या जबरदस्तीनं होणाऱ्या छुप्या धर्मांतरावर हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून स्थितप्रज्ञ झाल्यासारखं बसून राहतात. मुळातच हिंदूंच्या ऐच्छिक धर्मांतराचं प्रमाण खूपच कमी आहे. तशातच बेकायदेशीर धर्मांतर कसं काय वाढत आहे याचं उत्तर हे लोक देऊ शकतील का? अनेक हिंदू मुला-मुलींच्या जबरदस्तीनं (ऐच्छिक नव्हे) दुसऱ्या धर्मात होणाऱ्या विवाहाबद्दल हे लोक सतत मौन बाळगतात कारण त्याशिवाय यांचं तुष्टीकरणाचं राजकारण होऊ शकत नाही. आजकाल विवाह करण्याच्या नावाखाली मुलांना सुद्धा धर्मांतराची गळ घातली जात आहे. माझ्यासमोरच घडलेला एक ताजा प्रकार सांगतो. एका मुलीचं तिच्या 2 पिढ्यांपूर्वी हिंदू धर्मातून धर्मांतर केलं गेलं. आता ती मुलगी एका हिंदू मुलाला सांगत आहे की तू आमच्या धर्मात आलास तरच मी लग्न करेन. हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. कारण स्वातंत्र्याचा विचार केला तर दोघेही आपला धर्म पाळू शकतात. हेच जर उलटं झालं असतं तर या लोकांनी उपोषण, फलकबाजी, आरडाओरड, जनहित याचिका अशा अनेक गोष्टी करून धिंगाणा घातला असता. हा दुटप्पीपणा नव्हे काय? सर्व धर्म समान आहेत व त्यांचा आदर केलाच पाहिजे. मग त्यात सगळेच धर्म आले.
ढोंगी गोरक्षकांनी केलेल्या हत्यांवर भरभरून बोलणाऱ्या व्यक्ती खऱ्या गोरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत काहीही बोलायला तयार होत नाहीत. आधी गाईंसोबत क्रूरपणे व्यवहार करून भावना भडकवायच्या आणि नंतर मग लोक भडकले की अन्यायाच्या गाथा सांगायच्या. स्वतःच्या पसंतीचं खाण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि असलंच पाहिजे. पण त्यासाठी भावना दुखावतील असं काही करू नका असं हे लोक कधी सांगणार नाहीत. एवढीच भावनांची काळजी असती तर सगळी यंत्रणा ताब्यात असताना केरळच्या रस्त्यावर झालेली गायीची हत्या हे लोक थांववू शकले असते. पण थांबवायचं नव्हतं. त्यानंतर त्यांना भडकणाऱ्या भावना पहायच्या होत्या. त्याशिवाय यांना दंगा करायला वाव कसा मिळणार?
मुंबईच्या आझाद मैदानात ऑगस्ट 2012 मध्ये काही लोकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याबद्दल किरकोळ निषेध नोंदवण्याचे सोपस्कार पार पाडणाऱ्या लोकांकडून मोठ्या अपेक्षा करणे हे चुकीचंच आहे. तिथं महिला पोलिसांसोबत झालेल्या गैरवर्तणुकीवर बोलायला हे कोणीही दांभिक लोक पुढं आले नाहीत हे विशेष. कसं येणार? मोर्चा विशिष्ट वर्गाचा होता. त्यामुळं तिथं असले मुद्दे उठवून त्यावर पोळ्या भाजता येणार नव्हत्या. जेव्हा विशिष्ट हत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा हेच लोक दक्षिण भारतात होणाऱ्या स्थानिक वैचारिक विरोधकांच्या हत्यांबद्दल चकार शब्द काढण्यास तयार होत नाहीत. यांच्यापेक्षा वेगळ्या विचारसरणीचे लोक कोणत्याही कायदेशीर आरोपपत्राविना अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडतात तेव्हा यांना कळवळा येत नाही. पण हेच उमर खालिद किंवा कन्हैय्या कुमारच्या साध्या अटकेबाबत झालं तर मात्र अंगात सगळी शक्ती एकवटते. देशाचे तुकडे होणारे फलक झळकावले तरी हे हिरो असतात. उगीच त्यांना बोलावून आपलीच मुलं समजून कोण फोटो काढत नसतं.
माओवादासारख्या हिंसक गोष्टींचं क्रांतीच्या नावाखाली समर्थन करणारे जेव्हा हिंसेबद्दल बोलायला लागतात तेव्हा यांच्या दुटप्पीपणाचं ढोंग अधिकच ठळक दिसायला लागतं. जेव्हा लष्करी जवान व अधिकारी माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होतात तेव्हा या ढोंगी लोकांच्या ज्ञानातून जगण्याच्या अधिकाराचं पुस्तक जाणीवपूर्वक गायब होतं. लोकांचं कल्याण करण्याच्या ढोंगी आडोशामागून या 'रेड रिव्हॉलुशन'नं आजपर्यंत फक्त रक्ताचेच पाट वाहिले आहेत. 1997 पासून सुमारे 2700 पोलिस माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. हत्या झालेले सामान्य नागरिक वेगळेच. त्यामुळं आपण कोणत्या गोष्टींवर आवाज उठवत नाही नेमक्या त्याच गोष्टी कशा हिंसा करत आहेत हे विचार करण्यासारखं आहे. विशिष्ट लोकांच्या हत्येनंतर तांडव करणारे लोक माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या लष्करी जवान व अधिकार्यांसाठी निषेधाचे साधे हावभाव सुद्धा करत नाहीत हे इतिहास सांगतो. हे अत्यंत भीषण आहे. हे लोक दुसर्यांना दूषणं देतात, पण स्वतः त्यापेक्षाही भयानक मार्गावरून चालले आहेत हे दिसायला लागतं.
आपल्या कळपातल्या दोन-चार विचारवंतांच्या हत्या झाल्यावर थयथयाट करणारे लोक अतिरेक्यांच्या शिक्षेवेळी त्यांची तळी उचलायला चित्त्यापेक्षा अधिक वेगाने धावतात. त्यामुळं हेच लोक इतर वेळी मानवी हक्कांच्या बाबतीत कसे दांभिक आहेत याचा अंदाज आलाच असेल. मानवी हक्क ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये आपल्या देशबांधवांवर होणारा अन्याय रोखण्याची ताकद आहे. पण यांचे मानवी हक्क फक्त दहशतवादी, माओवादी, विशिष्ट धर्म समुदाय, रोहिंग्या व पॅलेट गन यांसारख्या मर्यादित व सोयीस्कर विषयांवर जागृत होतात. आम्हांला या जगाच्या पाठीवर असणारे सगळेच धर्म आदरणीय आहेत. पण धर्मद्वेष्ट्यांनी हे लक्षात घ्यावं दहशतवादाला कोणताच धर्म नसतो.
हेच विद्वान म्हणवणारे लोक वरीलपैकी एकाही गोष्टीचं उत्तर देऊ शकणार नाहीत. मुद्दा असा आहे की देशहिताच्या आड न येणारी कोणतीच विचारसरणी वाईट नसते. विचारसरणीचं समाजाला मारक न ठरणं हे जास्त महत्त्वाचं असतं. मग त्यात डावा उजवा असा फरक करण्याची गरज पडत नाही. देश म्हणजे एक प्रवाही नदी असते त्यात विविध प्रकारच्या विचारधारा एकत्रित असणं आवश्यक असतं. फक्त या गोष्टी दुसऱ्याला त्रास देणारा कट्टरवाद व हिंसेकडं झुकायला लागल्या की अहितकारक ठरतात. ज्या लोकांना हिंसा करण्याची प्रखर इच्छा आहे त्यांची आपल्या सीमारेषेवर अधिक गरज आहे. आपल्याच लोकांवर वार करण्यात कसलीच मर्दुमकी नसते. तशीच मर्दुमकी या दुटप्पीपणात नसते. असतो तो फक्त दांभिकपणा. कारण हाच दुटप्पीपणा एखाद्या हत्यारासारखा वापरला जात असतो. अशी अहिंसा हिंसेपेक्षाही अधिक घातक आहे हे वेळीच ओळखण्याची गरज आहे. हिंसेनं शरीर संपतं पण अशा विचित्र गोष्टींनी तुमचे विचार दूषित केले जातात.
गोध्रा आणि तत्सम प्रकरणं रवंथ करणाऱ्या प्राणिमात्रांपेक्षाही जास्त वेळा चघळणाऱ्या समस्त लोकांना काही गोष्टींचा सोयीस्करपणे विसर पडतो. काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या व त्यांच्यावर अत्याचार झाले तेव्हा हे मानवी अधिकारांचा पुरस्कार करणारे लोक पुरस्कार वापसी करून माओवादी क्रांतीच्या जंगलात गेले असावेत कदाचित. हे अत्याचार अतिशय भयानक होते ज्यामध्ये लोकांची जीभ कापण्यात आली, जिवंत जाळण्यात आलं. इतकंच नव्हे तर लाकूड कापण्याच्या यंत्रामध्ये घालून जिवंतपणी कापण्यात आलं. तेव्हा हे लोक डोळ्यावर पट्टया बांधून बसले होते.
घरवापसी या शब्दावर आरोपांची राळ होणारे लोक हिंदूंच्या जबरदस्तीनं होणाऱ्या छुप्या धर्मांतरावर हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून स्थितप्रज्ञ झाल्यासारखं बसून राहतात. मुळातच हिंदूंच्या ऐच्छिक धर्मांतराचं प्रमाण खूपच कमी आहे. तशातच बेकायदेशीर धर्मांतर कसं काय वाढत आहे याचं उत्तर हे लोक देऊ शकतील का? अनेक हिंदू मुला-मुलींच्या जबरदस्तीनं (ऐच्छिक नव्हे) दुसऱ्या धर्मात होणाऱ्या विवाहाबद्दल हे लोक सतत मौन बाळगतात कारण त्याशिवाय यांचं तुष्टीकरणाचं राजकारण होऊ शकत नाही. आजकाल विवाह करण्याच्या नावाखाली मुलांना सुद्धा धर्मांतराची गळ घातली जात आहे. माझ्यासमोरच घडलेला एक ताजा प्रकार सांगतो. एका मुलीचं तिच्या 2 पिढ्यांपूर्वी हिंदू धर्मातून धर्मांतर केलं गेलं. आता ती मुलगी एका हिंदू मुलाला सांगत आहे की तू आमच्या धर्मात आलास तरच मी लग्न करेन. हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. कारण स्वातंत्र्याचा विचार केला तर दोघेही आपला धर्म पाळू शकतात. हेच जर उलटं झालं असतं तर या लोकांनी उपोषण, फलकबाजी, आरडाओरड, जनहित याचिका अशा अनेक गोष्टी करून धिंगाणा घातला असता. हा दुटप्पीपणा नव्हे काय? सर्व धर्म समान आहेत व त्यांचा आदर केलाच पाहिजे. मग त्यात सगळेच धर्म आले.
ढोंगी गोरक्षकांनी केलेल्या हत्यांवर भरभरून बोलणाऱ्या व्यक्ती खऱ्या गोरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत काहीही बोलायला तयार होत नाहीत. आधी गाईंसोबत क्रूरपणे व्यवहार करून भावना भडकवायच्या आणि नंतर मग लोक भडकले की अन्यायाच्या गाथा सांगायच्या. स्वतःच्या पसंतीचं खाण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि असलंच पाहिजे. पण त्यासाठी भावना दुखावतील असं काही करू नका असं हे लोक कधी सांगणार नाहीत. एवढीच भावनांची काळजी असती तर सगळी यंत्रणा ताब्यात असताना केरळच्या रस्त्यावर झालेली गायीची हत्या हे लोक थांववू शकले असते. पण थांबवायचं नव्हतं. त्यानंतर त्यांना भडकणाऱ्या भावना पहायच्या होत्या. त्याशिवाय यांना दंगा करायला वाव कसा मिळणार?
मुंबईच्या आझाद मैदानात ऑगस्ट 2012 मध्ये काही लोकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याबद्दल किरकोळ निषेध नोंदवण्याचे सोपस्कार पार पाडणाऱ्या लोकांकडून मोठ्या अपेक्षा करणे हे चुकीचंच आहे. तिथं महिला पोलिसांसोबत झालेल्या गैरवर्तणुकीवर बोलायला हे कोणीही दांभिक लोक पुढं आले नाहीत हे विशेष. कसं येणार? मोर्चा विशिष्ट वर्गाचा होता. त्यामुळं तिथं असले मुद्दे उठवून त्यावर पोळ्या भाजता येणार नव्हत्या. जेव्हा विशिष्ट हत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा हेच लोक दक्षिण भारतात होणाऱ्या स्थानिक वैचारिक विरोधकांच्या हत्यांबद्दल चकार शब्द काढण्यास तयार होत नाहीत. यांच्यापेक्षा वेगळ्या विचारसरणीचे लोक कोणत्याही कायदेशीर आरोपपत्राविना अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडतात तेव्हा यांना कळवळा येत नाही. पण हेच उमर खालिद किंवा कन्हैय्या कुमारच्या साध्या अटकेबाबत झालं तर मात्र अंगात सगळी शक्ती एकवटते. देशाचे तुकडे होणारे फलक झळकावले तरी हे हिरो असतात. उगीच त्यांना बोलावून आपलीच मुलं समजून कोण फोटो काढत नसतं.
माओवादासारख्या हिंसक गोष्टींचं क्रांतीच्या नावाखाली समर्थन करणारे जेव्हा हिंसेबद्दल बोलायला लागतात तेव्हा यांच्या दुटप्पीपणाचं ढोंग अधिकच ठळक दिसायला लागतं. जेव्हा लष्करी जवान व अधिकारी माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होतात तेव्हा या ढोंगी लोकांच्या ज्ञानातून जगण्याच्या अधिकाराचं पुस्तक जाणीवपूर्वक गायब होतं. लोकांचं कल्याण करण्याच्या ढोंगी आडोशामागून या 'रेड रिव्हॉलुशन'नं आजपर्यंत फक्त रक्ताचेच पाट वाहिले आहेत. 1997 पासून सुमारे 2700 पोलिस माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. हत्या झालेले सामान्य नागरिक वेगळेच. त्यामुळं आपण कोणत्या गोष्टींवर आवाज उठवत नाही नेमक्या त्याच गोष्टी कशा हिंसा करत आहेत हे विचार करण्यासारखं आहे. विशिष्ट लोकांच्या हत्येनंतर तांडव करणारे लोक माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या लष्करी जवान व अधिकार्यांसाठी निषेधाचे साधे हावभाव सुद्धा करत नाहीत हे इतिहास सांगतो. हे अत्यंत भीषण आहे. हे लोक दुसर्यांना दूषणं देतात, पण स्वतः त्यापेक्षाही भयानक मार्गावरून चालले आहेत हे दिसायला लागतं.
आपल्या कळपातल्या दोन-चार विचारवंतांच्या हत्या झाल्यावर थयथयाट करणारे लोक अतिरेक्यांच्या शिक्षेवेळी त्यांची तळी उचलायला चित्त्यापेक्षा अधिक वेगाने धावतात. त्यामुळं हेच लोक इतर वेळी मानवी हक्कांच्या बाबतीत कसे दांभिक आहेत याचा अंदाज आलाच असेल. मानवी हक्क ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये आपल्या देशबांधवांवर होणारा अन्याय रोखण्याची ताकद आहे. पण यांचे मानवी हक्क फक्त दहशतवादी, माओवादी, विशिष्ट धर्म समुदाय, रोहिंग्या व पॅलेट गन यांसारख्या मर्यादित व सोयीस्कर विषयांवर जागृत होतात. आम्हांला या जगाच्या पाठीवर असणारे सगळेच धर्म आदरणीय आहेत. पण धर्मद्वेष्ट्यांनी हे लक्षात घ्यावं दहशतवादाला कोणताच धर्म नसतो.
हेच विद्वान म्हणवणारे लोक वरीलपैकी एकाही गोष्टीचं उत्तर देऊ शकणार नाहीत. मुद्दा असा आहे की देशहिताच्या आड न येणारी कोणतीच विचारसरणी वाईट नसते. विचारसरणीचं समाजाला मारक न ठरणं हे जास्त महत्त्वाचं असतं. मग त्यात डावा उजवा असा फरक करण्याची गरज पडत नाही. देश म्हणजे एक प्रवाही नदी असते त्यात विविध प्रकारच्या विचारधारा एकत्रित असणं आवश्यक असतं. फक्त या गोष्टी दुसऱ्याला त्रास देणारा कट्टरवाद व हिंसेकडं झुकायला लागल्या की अहितकारक ठरतात. ज्या लोकांना हिंसा करण्याची प्रखर इच्छा आहे त्यांची आपल्या सीमारेषेवर अधिक गरज आहे. आपल्याच लोकांवर वार करण्यात कसलीच मर्दुमकी नसते. तशीच मर्दुमकी या दुटप्पीपणात नसते. असतो तो फक्त दांभिकपणा. कारण हाच दुटप्पीपणा एखाद्या हत्यारासारखा वापरला जात असतो. अशी अहिंसा हिंसेपेक्षाही अधिक घातक आहे हे वेळीच ओळखण्याची गरज आहे. हिंसेनं शरीर संपतं पण अशा विचित्र गोष्टींनी तुमचे विचार दूषित केले जातात.
टीप- या लेखामुळे जर कोणाचा छुपा अजेंडा उघड झाला असेल तर त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे.

