भाडोत्री नव्हे, आपलं सरकार
1999 पासून 15 वर्षे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळी वर्षे होती. एकतर सरकारकडे स्वतःची अशी कामे नव्हती. त्यामुळे दरवेळी दुसऱ्याच मुद्द्यांचा आधार घेऊन लढणाऱ्या सरकारला दुसरं काय म्हणणार? काळी वर्षे म्हणण्याचं कारण यांची काळवंडलेली कारकीर्द. त्या कारकिर्दीत सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, लवासा....थांबूया... कारण यादी मोठी होत चाललीय. आपल्याला सकारात्मक बोलायचंय. पण तरीही या काळवंडलेल्या कारकीर्दीचं सर्वोच्च टोक सांगतो...लोडशेडिंगमुळे अख्ख्या महाराष्ट्राला यांनी काळोखात लोटलं. पण महाराष्ट्र म्हणजे तुमचं सरकार नाही काळवंडून जायला. म्हणूनच महाराष्ट्राने 2014 साली परिवर्तन घडवलं.
15 वर्षांच्या सरकारला भाडोत्री म्हणण्याचं कारण थोडं बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल. 2004 च्या निवडणुकीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचं आश्वासन (जे अखेर आपल्या सरकारने मार्गी लावलं, कारण यांचे नेते केवळ बोटीतून केसांना भांग पाडत जात होते) आणि केंद्रात झालेलं सत्तांतर या मुद्द्यांवर आघाडी सरकारने पुन्हा सत्ता आणली. 2008 साली मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला होऊन देखील हे सरकार 2009 साली पुन्हा सत्तेत आलं. कारण काय तर 2009 मध्ये 'सरसकट' कर्जमाफी केल्याने केंद्रात काँग्रेसचं सरकार अधिक संख्याबळासह आलं, मनसेने मतं खाल्ली म्हणून यांचे 20-25 आमदार जिंकले. सरकारचं असं काहीच कर्तृत्व नव्हतं. तरीही जिंकले. म्हणजे मुळात सत्तेत येण्याची कारणंच भाडोत्री होती. मग सरकार भाडोत्री नव्हे काय?
2014 ला मात्र यांची डाळ शिजली नाही. कारण केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र होते. मग आलं 'आपलं सरकार'. ते सगळं ठीक आहे, पण आपलं सरकार म्हणजे काय? आपण निवडलेलं सरकार वगैरे पुस्तकी गोष्टी झाल्या. सध्याचं सरकार उद्या सत्तेत येईल तेव्हा त्यांच्याजवळ स्वतः केलेल्या कामांचं कारण असेल. कुठल्याही उसन्या किंवा भाडोत्री कारणांची गरज असणार नाही. या सरकारने सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा सर्वांत मोठा निर्णय घेतला तो म्हणजे सेवा हमी कायदा. सरकार हे जनतेच्या सेवेसाठी असून ती सेवा जनतेला वेळेत मिळण्याची हमी देणारा हा कायदा. एवढंच नाही तर मुख्य लोकसेवा आयुक्त नेमून नागरिकांना लागणाऱ्या 496 सेवांपैकी 403 सेवा ऑनलाईन देखील करण्यात आल्या. या सरकारमध्ये आणि आपल्यात फक्त एका क्लिकचं अंतर आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय केवळ डिजिटल माध्यम वापरून एवढ्या जवळ आलेलं सरकार आपलंच नव्हे काय? 2014 पूर्वी हा विचार करणाऱ्याला कोणीही मूर्खात काढले असते. पण आज 2019च्या निवडणुकीला सामोरे जाताना आपण आपलं सरकार बघतोय. आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री वादग्रस्त वर्तन आणि भ्रष्टाचाराने कार्यकाळ पूर्ण न करताच पायउतार झाले. कितीही खोटे जातीय आरोप केले गेले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याच वादात सापडले नाहीत. म्हणून पुन्हा देवेंद्रच.

