स्थगिती सरकार- स्थगित योजना
महाविकास आघाडी सरकारने काय केलं याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा स्थगिती दिली हे पहिल्या क्रमांकावर लिहिलं जाईल. त्यांना स्वतःला खूप काही करण्यासारखं होतं. पण त्यांनी स्वतः काही न करता केवळ आधीच्या सरकारने केलेल्या चांगल्या योजनांचं श्रेय माजी सत्ताधाऱ्यांना मिळू नये यासाठी त्यांच्या चांगल्या योजनांना स्थगिती देण्याचे काम तेवढं आवर्जून केलं.
1. मराठवाडा वॉटर ग्रीड
मराठवाड्या वरचा दुष्काळग्रस्त हा शिक्का कायमचा पोहोचण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. यासाठी इस्रायल सरकारचेही सहाय्य घेण्यात आले होते. येत्या काही वर्षात मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटला असता. पण ठाकरे सरकारने याला स्थगिती देऊन मराठवाड्याला पुन्हा एकदा दुष्काळाच्या खाईत लोटलं आहे.
2. जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना होती आणि त्याप्रमाणे अत्यंत मेहनतीने या योजनेची अंमलबजावणी करून त्याचे फायदे जनतेला करून देण्यात आले. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भूजल पातळी वाढण्यासाठी या योजनेचा उपयोग झाला. तसंच महाराष्ट्राचा टँकरवरती होणारा खर्च देखील कमी झाला. शिवाय ही योजना दूरगामी परिणाम देणारी असल्याने चालू ठेवणे अत्यंत आवश्यक होते. पण केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकारने या योजनेला स्थगिती देऊन स्वतःचं काहीतरी हवं या नावाखाली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना या नावाने नवीन योजना बनवण्यात आली. पण त्यावर फारसं काही काम झालेलं आढळत नाही.
3. मेट्रो कारशेड
मुंबईची आगामी वीस ते पंचवीस वर्षातील पायाभूत सुविधांपैकी एक असणाऱ्या दळणवळणाची आवश्यकता लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आला. या मेट्रोची कारशेड आरे कॉलनीत प्रस्तावित करण्यात आली व त्याचे बरेचसे कामही प्रगतीपथावर होते. पण ढोंगी पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला बळी पडून केवळ बाल हट्टापायी ठाकरे सरकारने कारशेडला स्थगिती देऊन जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान केलं. शिवाय यामुळे मेट्रो प्रकल्पाला दिरंगाई झाली ते वेगळंच. त्यामुळे मुंबईकरांचं नुकसान मुंबईचे मसीहा म्हणणाऱ्यांनीच केलं आहे. गंमत म्हणजे आज आखेर कारशेड ची जागा निश्चित झाली नाहीये कधी कांजूरमार्ग तर कधी अन्यत्र यातच चर्चा अडकली आहे.
4. बुलेट ट्रेन
मुंबई-अहमदाबाद या मार्गावर होणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाला देखील स्थगिती देण्यात आली. वास्तविक हा मार्ग मनमोहन सिंग सरकारच्या काळातच निश्चित करण्यात आला होता पण केवळ मराठी अस्मितेचा बागुलबुवा करून लोकांमध्ये खोटे समज पसरवून या चांगल्या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली
5. हायपरलूप
मुंबई पुणे हा प्रवास अधिक सुखकर आणि जलद व्हावा यासाठी हाइपर्लूप या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चाचपणी करण्यात आली होती. जेणेकरून येत्या काही वर्षात हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. पण यालाही ठाकरे सरकारने स्थगिती देण्याचं काम केलं आहे.
6. मुख्यमंत्री फेलोशिप
तरुण मुलांना राज्य शासनासोबत काम करता यावं, सर्व सिस्टिम जवळून अभ्यासता यावी, रुची असेल तर भविष्यात यामध्ये करियर करता यावं आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे राज्याच्या प्रगतीमध्ये स्वतःचे योगदान देता यावं या उदात्त हेतूंनी मुख्यमंत्री फेलोशिप ही योजना सुरू करण्यात आली होती. गेली चार-पाच वर्षे तरुणाईने या योजनेला चांगला प्रतिसाद दिला होता तरीही केवळ देवेंद्र फडणवीस यांची योजना म्हणून या योजनेला स्थगिती देण्यात आली.
7. शिक्षणाची वारी
प्रयोगशील शिक्षकांनी त्यांच्या शाळांमध्ये राबवलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग हे राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांपर्यंत पोहोचावेत यासाठी फडणवीस सरकारच्या काळात शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला होता पण ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर हा उपक्रम सुरूच ठेवला गेला नाही. या उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याची भीती अनेक शिक्षकांनी व्यक्त केली. या वारीमध्ये अनेक शिक्षक भेट देऊन सदर उपक्रम आपल्या शाळांमध्ये राबवायचा प्रयत्न करायचे. पण ही वारी बंद पडल्याने या सगळ्याला खीळ बसली.
क्रमशः





